Wednesday 4 January 2017

महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त बनवण्यासाठी मराठी कलाकारांचे योगदान...

                      महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त बनवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्यात अमीर खाननेही हातभार लावलाय दुष्काळ मुक्त महाराष्ट्रासाठी अमीर खान आणि किरण राव यांनी ' पानी फाऊंडेशन ' हि संस्था सुरु केली.सत्यमेव जयते या संस्थेच्या काही महत्वाच्या मंडळींनी या उपक्रमात मोलाची साथ दिली. या संस्थे अंतर्गत अनेक मराठी कलाकारांनी देखील योगदान दिले आहे. सई ताम्हणकर,सुनील बर्वे, नागराज मंजुळे, अजय -अतुल,रिंकू राजगुरू,आकाश ठोसर,तानाजी गलगुंडे,अरबाज शेख,फातिमा सना खान,सोनाली कुलकर्णी, जितेंद्र जोशी आणि अमीर खान हे सगळे स्टार आपल्याला एका गाण्यातून दुष्काळ मुक्त महाराष्ट्राचा सल्ला देत आहेत. अजय अतुल रचित आणि गुरु ठाकूर लिखित 'तुफान आलं' हे गाणं नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलं असून अजय गोगावले यांच्या आवाजातून हे गाणं सजलेलं आहे.विशेष बाब म्हणजे यात किरण राव हिने पहिल्यांदा गाणं गायले आहे.


 महाराष्ट्रातील एकंदर परिस्थितीवर भाष्य करणार हे गाणं आहे. महाराष्ट्रातील सत्य परिस्थिती नागराज मंजुळे यांनी आपल्या दिग्दर्शनातून दाखवून दिली.  'तुफान आलं' हे गाणं सध्या youtube वर उबलब्ध आहे. या महत्वपूर्ण कामासाठी दंगल,सैराट टीम तसेच इतर कलाकारांना majja.ooo तर्फे शुभेच्छा.








majja.ooo : Ankita Lokhande.

No comments:

Post a Comment