ज्या चित्रपटाची प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट बघत आहे तो रांजण चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या १७ फेब्रुवारी २०१७ ला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अजय गोगावलेच्या आवाजाने रंगलेलं लागीर झालं रं गाणं सोशल मीडियावर प्रचंड उत्साहात गाजतंय. मराठीमध्ये प्रेम,मैत्री,समाज या विषयांवर नेहमीच चित्रपट येतात परंतु रांजण हा चित्रपट या तिन्ही घटकांनी परिपूर्ण आहे असं म्हणायला काही हरकत नाही. चित्रपटामध्ये दिसणारी यश आणि गौरी यांची फ्रेश जोडी देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
हा चित्रपट सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारा असणार आहे. लहान वयातील प्रेम आणि ह्याच प्रेमातून सामाजिक संदेश या चित्रपटात देण्यात आला आहे. चित्रपटाचं कथानक कुतुहूल वाढवणारं आहे.चित्रपटाचं दिग्दर्शन हे अतिशय उत्तम पद्धतीने सादर करण्यात आलं आहे. लहान कलाकारांचा अभिनय नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात काही शंका नाही. चित्रपटाची इतर गाणी अजूनतरी गुलदस्त्यात आहेत हि इतर गाणीही तितकीच जबरदस्त असतील आणि रांजण चित्रपटाचा स्थर अजून उंचावेल अशी आशा.
. श्री महागणपती एंटरटेन्मेंटच्या रवींद्र कैलास हरपळे यांनी ‘रांजण’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचं कथा-पटकथा लेखन व दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलं आहे. तर, संवादलेखन प्रकाश पवार व नीलेश भोसले यांचं आहे.
majja.ooo : Ankita Lokhande.
हा चित्रपट सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारा असणार आहे. लहान वयातील प्रेम आणि ह्याच प्रेमातून सामाजिक संदेश या चित्रपटात देण्यात आला आहे. चित्रपटाचं कथानक कुतुहूल वाढवणारं आहे.चित्रपटाचं दिग्दर्शन हे अतिशय उत्तम पद्धतीने सादर करण्यात आलं आहे. लहान कलाकारांचा अभिनय नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात काही शंका नाही. चित्रपटाची इतर गाणी अजूनतरी गुलदस्त्यात आहेत हि इतर गाणीही तितकीच जबरदस्त असतील आणि रांजण चित्रपटाचा स्थर अजून उंचावेल अशी आशा.
. श्री महागणपती एंटरटेन्मेंटच्या रवींद्र कैलास हरपळे यांनी ‘रांजण’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचं कथा-पटकथा लेखन व दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलं आहे. तर, संवादलेखन प्रकाश पवार व नीलेश भोसले यांचं आहे.
majja.ooo : Ankita Lokhande.
No comments:
Post a Comment