Thursday 2 February 2017

दोन विनोदवीरांसोबत झळकणार एक खलनायक...

                 रांजण या चित्रपटाची सगळीकडे प्रसिद्धी होताना आपण बघतंच आहोत. चित्रपटाची गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. लगीर झाल रं आणि लय वळवळतंय या गाण्यांना प्रचंड मिळत आहे . तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाची सर्वानाच उत्सुकता आहे. या चित्रपटात तीन ओळखीचे चेहरे पाहायला मिळतात ते म्हणजे विद्याधर जोशी,भाऊ कदम आणि भारत गणेशपुरे.दोन विनोदवीरांसोबत एक खलनायक रांजण या चित्रपटात झळकणार आहे.विद्याधर जोशी ह्या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार आहे.भाऊ कदम,भारत गणेशपुरे हे कलाकार नेहमीप्रमाणे प्रेक्षकांना हसवण्याची धुरा सांभाळणार असे दिसून येतंय.

                  सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारा हा चित्रपट विनोदी पद्धतीने प्रेक्षकांचं मनोरंजन सुद्धा करणार आहे. चित्रपटाचं कथानक कुतुहूल वाढवणारं आहे.चित्रपटाचं दिग्दर्शन हे अतिशय उत्तम पद्धतीने सादर करण्यात आलं आहे. श्री महागणपती एंटरटेन्मेंटच्या रवींद्र कैलास हरपळे यांनी ‘रांजण’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचं कथा-पटकथा लेखन व दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलं आहे. तर, संवादलेखन प्रकाश पवार व नीलेश भोसले यांचं आहे.




majja.ooo : Ankita Lokhande.

No comments:

Post a Comment